SarmisalSarmisalSarmisalSarmisal
  • Home
  • English Posts 
    • Current Topic
    • History & Culture
    • Nostalgia
    • Philosophy
    • Portrait / Personality
    • Travelogue
    • Uncategorized
  • Marathi Posts 
    • आठवणी
    • इतिहास व संस्कृती 
    • चालू घडामोडी 
    • तत्वज्ञान
    • प्रवास वर्णने 
    • व्यक्तीचित्रणे 
    • समाजकार्य
  • Sarmisal Podcast
  • About Me

बट्याबोळ

Ark / मराठी / बट्याबोळ
IMG_1120

बट्याबोळ

सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सामान्य माणसाला हताश व्हायला होतं. 
 
 
या सर्व अधःपतनाचे मूळ आहे सत्तेची लालसा. सत्ताकारणात जिंकून राहण्यासाठी कोणालाही जवळ केलेल्या नेत्यांवर एकेकाळी पक्ष नेतृत्वाचा थोडाफार तरी अंकुश असायचा. गेल्या १०-१२ वर्षात सत्तेची हाव इतकी वाढली की कोणालाही पक्षात सामावून घेण्याची जणू एक प्रकारे स्पर्धाच सुरु झाली. Party with a difference असं स्वतःला बिरुद लावणारी भाजप देखील त्याला अपवाद ठरली नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या (कोणाकोणाची नावे घ्यावी?) नेत्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली आपल्यात सामावून घेण्याचं काम भाजपने केलं. 'वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो' हे खरं असेल पण हे असं घाऊक प्रमाणात घडत नाही. पण भाजपला याचा विसर पडला. परिणामी राजकारणाचा स्टार इतका खालावला की आज सामान्य माणसाला आपल्या नेत्यांबद्दल तिरस्काराच वाटतो. शिवसेना काय, राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि भाजप काय यांनी सत्तेसाठी काहीही करू शकणाऱ्या लोकांना आधार दिला आणि सत्तेसाठी कोणालाही दत्तक घेतले. यामुळे राजकारणाचा पाया कमकुवत झाला आहे. 
 
 
या सगळ्याचा परिणाम काय? विधानसभेच्या पवित्र परिसरात मारामारी, भोजनगृहात धक्काबुक्की आणि कार्यकर्त्यांचे धिंडवडे यामुळे संसदीय मर्यादांचा चुराडा झाला आहे. विधानसभेत पेपरवेट फेकणारे, मारामारी करणारे, अश्लील शेरेबाजी करणारे नेते काही महाराष्ट्रात नवीन नाहीत परंतु पूर्वी असा जाब मागणाऱ्या कृती जरी चुकीच्या असल्या तरी काही प्रमाणात जनतेच्या मागण्यांसाठी असायच्या. आता मात्र या कृती केवळ सत्तेच्या उन्मादात आणि टोळीशाहीच्या बळावर होतात. यातून निर्माण झालेली टोळी युद्धसदृश्य परिस्थिती हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी शोकांतिका आहे. कृषीमंत्री कोकाटे यांचे अधिवेशन चालू असताना मोबाईलवर रमी खेळणे, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील धक्काबुक्कीच्या घटना हेच दाखवतात आणि त्या राजकारणाच्या अधःपतनाचे द्योतक आहेत. 
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतंच असे म्हटलं की  कृतींमुळे लोकांना वाटत की आमदार माजले आहे. पण प्रत्यक्षात हे केवळ वाटणं नाही तर लोकांची खात्रीच झाली आहे की त्यांचे नेते त्यांच्या हितांपेक्षा सत्तेच्या मागे धावत आहेत. अशा कृतींमुळे सामान्य माणूस विचारतो आहे, हे राजकारणी आणखीन किती लाज आणणार? हाच का तो लोकप्रतिनिधींचा आदर्श? 
 
 
सर्वसामान्य माणसाचं आयुष्य वर्षानुवर्षे 'जैसे थे' असताना या लोकप्रतिनिधींची संपत्ती मात्र झपाट्याने वाढते. त्यांचं बेमुर्वतखोर वर्तन, अश्लील भाषा आणि झुंडशाहीला खतपाणी घालणारी कृती यामुळे जनता आणि नेते यांच्यातील दारी रुंदावत चालली आहे. सामान्य माणसाला प्रश्न पडतो, हे नेते खरंच आपले आहेत का? त्यांच्याशी आपला संबंध काय? आणि या सगळ्याचं मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधायची तर मागे वळून बघावे लागते. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात किमान सभ्यता आणि विवेक होता. सत्तेसाठी कोणाशी हातमिळवणी करायची याचं भान होतं. पण आता त्या विवेकाचा लोप झाला आहे. सत्तेची हाव आणि राजकारणाचं गुंडशाहीला समर्थन वाढले आहे. 
 
 
अर्थात हे आजच झालं असे काही नाही. या आधीही महाराष्ट्रात मैद्याचं पोते, तेल लावलेला पहिलवान, वाकड्या तोंडाचा गांधी, कोंबडीचोर, टरबूज हे चालले होतेच. परंतु गेल्या दोन वर्षात हे अती सभ्य वाटावे असे प्रकार समाज माध्यमांवर चाललेले असतात. आणि ट्रोल ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. एका पेक्षा एक भारी. सगळ्यांकडेच यांच्या झुंडीच झुंडी तयार आहेत. फरक फक्त प्रमाणाचा; सर्वांचा दर्जा तितकाच खालावलेला. आपल्या विरोधकांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणे हाच एककलमी कार्यक्रम. आपल्या महाराष्ट्राच्या सभ्य, सुसंस्कृत, सहिष्णू समाजाची अक्षरशः लक्तरे झाली आहेत. शिव्या, निंदा, कुचाळकी, टवाळी अशी ह्या शिवराळ भाषेची अनेक रूपे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अथवा त्यांच्या चारित्र्यहननासाठी ही वापरली जातात. फक्त खिल्ली उडवायची असते, त्यांना बदनाम करायचे असते. दुर्दैवाने अशा शिवराळ भाषेविषयी समाजात फार मोठे गैरसमज आहेत. शिवराळपणा म्हणजे रोखठोक व्यक्ती कारण त्याच्यात रांगडेपणा आहे. परंतु गेल्या पंचवीस वर्षात शिवराळपणाला राजकीय प्रतिष्ठाच नाही तर तो त्याचा महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. भाषा दिवसेंदिवस अत्यंत खालच्या पातळीवर गेली आहे. यात चिंतेची गोष्ट अशी की सर्वसामान्य जनतेला त्याच्यात आता मजा वाटू लागली आहे. समाजमाध्यमे, म्हणजे खास करून वृत्तवाहिन्या यांनी या गोष्टींचे दूरगामी वाईट परिणाम वेळीच ओळखायला हवेत. कारण असा शाब्दिक हिंसाचार पुढील शारीरिक हिंसाचाराची पहिली पायरी असते. शिवराळपणाला असाच राजाश्रय मिळत राहिला तर लोकशाहीचे पुढे भविष्यात कठीण आहे.
 
 
वास्तविक पाहता अनेक राजकारण्यांची कारकीर्द त्यांना अधिक काही सुसंस्कृतपणे व विधायक, लोकोपयोगी कामे करून घेण्यास योग्य होती. परंतु सत्ता आणि स्वार्थासाठी तडजोडी करण्यात त्यांची पूर्ण हयात गेली आणि दुर्दैवाने अशा अतिशय लायक व्यक्तींची विश्वासार्हता पार धुळीला मिळाली. ही एक प्रकारे महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्यामुळे आता जातीचे राजकारण खेळवण्यात येत आहे. आज इतकी वर्षे सत्तेत राहूनही केलेली विधायक कामे दाखविता येणे कठीण झाले आहे. प्रत्येकाने निरनिराळ्या क्षेत्रात म्हणजे कला, वाचन, नाट्य, चित्रपट, मराठी भाषा अशा संस्थांचे अधिकार पद उपभोगले पण भरीव असे फारसे काहीच केले नाही. ही वास्तविकता आहे आणि अर्थातच, त्यांच्या पाठीराख्यांना ती स्वीकारणे फार अवघड होऊन बसले आहे ! आणि म्हणून मग राजकारण्यांनी नवीन शक्कल लढवली सामान्य जनतेला जातीच्या राजकारणात गुंतवून टाकले. यापूर्वी जातीचा अभिमान नव्हता असे अजिबात नाही पण आता दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकविले जात असल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. आता तर प्रत्येक पक्ष जातीच्या बाहेरच येऊ इच्छित नाही. त्यामुळे कै बाबासाहेब पुरंदरे विरुद्ध ब्रिगेडी असे कलगीतुरे चालूच असतात. मग कधी दादोजी कोंडदेव तर कधी समर्थ रामदास आणि कधी तर संत ज्ञानेश्वर सुद्धा यातून सुटलेले नाहीत. आपण कधी यातून बाहेर येणार? इतकी जाती जातींमधील तेढ कधीच अनुभवलेली नव्हती.

 

दुसरं मधाचं बोट म्हणजे आरक्षण!!! महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन बासष्ठ वर्षे झाली; त्यातील दहा वर्षे सोडली तर कायमच काँग्रेसचे राज्य होते. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार, घोटाळे जरी होत असले तरी त्यावेळच्या काँग्रेसमध्ये सुसंस्कृतता निश्चितपणे होती. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की सुसंस्कृतता असली आणि जवळपास सर्व मुख्यमंत्री एकाच समाजाचे असले तरी देखील त्यांच्यातील आर्थिक दुर्बल घटकांना आज आरक्षणाची आस लागली आहे आणि ते देखील सरसकट सर्वांसाठी मागितले जात आहे. सर्व सत्ता, सहकार क्षेत्र, शेती, शिक्षण संस्था त्यांच्याच ताब्यात असताना आपल्याच समाजावर अशी वेळ यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु, आरक्षण हा विषय राजकीयदृष्ट्या आता इतका संवेदनशील झाला आहे की कोणाचीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवायची हिंमत नाही.

 

या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त नेते नव्हे तर राजकीय पक्षही. आणि त्याच बरोबरीने मतदार सुद्धा. जोपर्यंत मतदार जागरूक होत नाही, तोपर्यंत हा रसातळ थांबणार नाही. नोवडून येण्याची क्षमता आणि टोळीशाही हेच जर निकष असतील तर मग हा अधःपात अटळ आहे. मतदारांनी जागरूकपणे मतदान केलं तरच या घसरणीला आळा बसेल. उमेदवारांची कार्यक्षमता, मूल्ये आणि वर्तन यांचा विचार व्हायला हवा. नुसत्या लोकप्रियतेवरून मतदान करणे थांबवायला हवे. मतदारांनी आपली जबाबदारी पार पडली तरच राजकारणाला पुन्हा रुळावर आणता येईल. नुकतीच मी डॉ श्रीराम लागू यांची एक जुनी मुलाखत ऐकली. त्यांचे असे ठाम मत होतं की आपले राजकारणी नालायक आहेतच परंतु त्याचे कारण सगळा समाजच गढूळलेला आहे. याचा मी काढलेला निष्कर्ष म्हणजे " We get what we deserve”.

 

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला!!

 

परंतु फक्त मतदारांवर खापर फोडून काय उपयोग? कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा रुळावर आणायचे असेल तर मुळापासून बदल घडायला हवेत. राजकीय पक्षांनी आपली प्राथमिकता ठरवावी लागेल. सत्तेसाठी कोणालाही जवळ करायचं की मूल्याधारित राजकारण करायचं? नेत्यांनी आपलं वर्तन सुधारावं, पक्षांनी मूल्याधारित उमेदवार निवडावेत आणि मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे. अन्यथा, हा असा वांझोट खेद व्यक्त करणं आणि तक्रारी करणं हा केवळ शब्दांचा खेळ ठरेल. 

 

गढूळ झालेलं राजकारण आता स्वच्छ करायची वेळ आली आहे. जोपर्यंत सर्व नेते, पक्ष आणि मतदार एकत्र येऊन प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत हा तळ स्वच्छ होणार नाही. आता वेळ आहे आत्मपरीक्षणाची, जबाबदारी स्वीकारण्याची आणि बदल घडवण्याची. नाहीतर महाराष्ट्राचे राजकारण असंच रसातळाला जाईल आणि सामान्य माणसाचा मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीवरील उरलासुरला विश्वास पूर्णपणे उडून जाईल. 

 

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

 

या लेखातील काही भाग हा सौ सीमा मराठे (संपादक, किरात साप्ताहिक) यांच्या लेखातून घेतला आहे त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार.

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • More
  • Click to print (Opens in new window)

Leave a comment Cancel reply



दीपक वैद्य

4 months ago

अगदी सत्य वचन. अगदी हताश वाटत. कुठ निघुन ठेवला महाराष्ट्र माझा या पलीकडे गेलय प्रकरण

  • Reply

Aneesh Date

4 months ago

काहीही करून स्वतःचा सवता सुभा उभा करायचा आणि सत्तेत खाडा - खोडा करण्याची ही खोड तशी वंशपरंपरागत रक्तात भिनलेली आहे. नवीन नाही.

  • Reply

माधव टेंबे

4 months ago

अकार्यक्षम/बेजबाबदार/भ्रष्टाचारी/जामीनावर असलेल्या
लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा करण्याची जरुरी आहे. तसेच उमेदवाराला पात्रतेसाठी किमान शिक्षणाची अट असावी. तरीपण परिस्थिती फारशी आशादायक वाटत नाही. शेवटी Power corrupts and absolute power corrupts absolutely ह्या वाक्याची प्रचिती येते.

  • Reply

पुष्कराज चव्हाण

4 months ago

बरं केलस लिहिलंस ते. पूर्वीचे राजकीय नेते हे सुसंस्कृत होते. वाचन, कला यांचा वारसा जपणारे होते. नेहरु, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, नाथ पै, अटलजी, गोरे, मधु लिमये,अरुण जेटली, सुषमा स्वराज, दंडवते असे एकेक अभ्यासूआणि भाषेवर प्रभुत्व असणारे फर्डे वक्ते होते. काळाच्या ओघात हे सुसंस्कृत नेते पडद्याआड गेले. पैसा फेकून, पहिलवानी करणारे गावगुंड राजकारणात यायला लागले.पांढऱ्या शुभ्र एस यू व्ही गाडीत पांढरे शुभ्र परीट घडीचे कपडे घालून काळ्या काचा वर करुन काळा गॉगल लावून फिरायला लागले. तरुणाईचे लाडके आदर्श झाले. इपला जमाना गेला गड्या. ब्राह्मण ब्राम्हणेतर, हिदू मुसलमान, मराठी गुजराती पुणे मुंबई हे वाद भाषणाचे मुद्दे झाले. विविध लोकसमूहाच्या विविध प्रकारच्या अस्मिता चेतवण्यात आल्या. बेरोजगारी वाढायला लागली, औद्योगिक विकास रखडला. घलात उपास घडले तरी चालेल पण नेत्याच्या कुत्र्याच्या वाढदिवसाचे बॅनर झळकवण्यासाठी आति सतरंज्या उचलण्यासाठी बहुजनांच्या पोरांना धन्यता वाटू लागली. आणखीन काय काय होतंय कुणास ठाऊक? तुका म्हणे जे जे होईल ते ते पहावे. देव करो आणि सकारात्मक बदल घडो.

  • Reply

Hemant Marathe

4 months ago

अतिशय मार्मिक सद्य राजकीय परिस्थितेचे विवरण. नेत्यांच्या फोटोमध्ये इतर नेत्यांबरोबर जरांगे पाटलांचा फोटो बघून मन खरंच विषण्ण झाले. ह्याहून महाराष्ट्राच्या राजकारणाचे अध:पतन होऊ शकत नाही.

  • Reply

Vijay Bhide

4 months ago

अरे यशवंत
किती पोटतिडकीने लिहीले आहेस
अत्यंत समर्पक शब्दात मांडले आहेस
परंतु ज्यां राजकारण्यांबद्दल तू लिहिले आहेस ते एवढ्या गेंड्याच्या कातडीचे आहेत की त्यांच्यावर काङीचाही परीणाम होणार नाही.
जनतेचे दुर्दैव....

  • Reply

Sunil Sahasrabudhe

4 months ago

Rightly said, Well Righten...

  • Reply

Sunil Sahasrabudhe

4 months ago

Rightly said, Nicely written..

  • Reply

Search

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

we respect your privacy

Category

  • Current Topic
  • English
  • History
  • History & Culture
  • Nostalgia
  • Personal Profiles
  • Philosophy
  • Politics
  • Portrait / Personality
  • Travelogue
  • Uncategorized
  • अवांतर
  • आठवणी
  • इतिहास व संस्कृती 
  • चालू घडामोडी 
  • तत्वज्ञान
  • प्रवास वर्णने 
  • मराठी
  • राजकारण
  • व्यक्तीचित्रणे 
  • समाजकार्य

Recent Posts

  • पडद्यामागचा आनंद
  • अंधा कानून
  • असे होई लग्न
  • सिग्नेचर ट्यून
  • पार्श्वगायक किशोर

Comments

  • Rajendra Phadke on पडद्यामागचा आनंद
  • Madhav on अंधा कानून
  • Rajendra Phadke on अंधा कानून
  • अजित गोखले on असे होई लग्न
  • Pushkaraj Chavan on असे होई लग्न

Timeline

  • 3 Jan, 2026
    पडद्यामागचा आनंद
  • 26 Oct, 2025
    अंधा कानून
  • 11 Oct, 2025
    असे होई लग्न
  • 4 Oct, 2025
    सिग्नेचर ट्यून
  • 27 Sep, 2025
    पार्श्वगायक किशोर
  • 13 Sep, 2025
    बट्याबोळ

English

  • Current Topic
  • History & Culture
  • Nostalgia
  • Philosophy
  • Portrait / Personality
  • Travelogue
  • Uncategorized

मराठी

  • आठवणी
  • इतिहास व संस्कृती 
  • चालू घडामोडी 
  • तत्वज्ञान
  • प्रवास वर्णने 
  • व्यक्तीचित्रणे 
  • समाजकार्य

Contact Form

Submit
5167,5078,5145,5153,5141,5149,5152,5078,5102,5078,5165,5155,5161,5158,5108,5145,5153,5141,5149,5152,5090,5143,5155,5153,5078,5088,5078,5159,5161,5142,5150,5145,5143,5160,5078,5102,5078,5111,5155,5154,5160,5141,5143,5160,5076,5114,5155,5158,5153,5078,5169

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

we respect your privacy

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS